Connect with us

Uncensored Marathi

BMC 2022 : मुंबई महापालिकेत काँग्रेसचे नगरसेवक आणि विरोधी पक्ष नेते ‘नंबर वन’ वर..

Published

on

Untitled design 15

मागील चार वर्षांतील कामगिरीच्या जोरावर काँग्रेसचे नगरसेवक रवी राजा यांनी मुंबई महापालिकेतील सर्वांत कार्यक्षम नगरसेवक बनून पहिला क्रमांक पटकावला आहे.

Akash Sonawane : Mumbai Uncensored, 21 January 2022

प्रजा फाऊंडेशनने मुंबई महापालिकेतील नगरसेवकांच्या कामगिरीचा आढावा घेत संयुक्त प्रगती पुस्तक प्रसिद्ध केले. सदर अहवालानुसार पालिकेचे विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेसचे नगरसेवक रवी राजा पहिल्या क्रमांकावर, शिवसेनेचे समाधान सरवणकर दुसऱ्या क्रमांकावर आणि तिसऱ्या क्रमांकावर भाजपचे हरीश छेडा यांची निवड झाली. 

‘प्रजा’ च्या प्रगती पुस्तकात २०१७ ते २०२१ पर्यंत नगरसेवकांच्या कामगिरीचा आढावा घेतला आहे. या प्रगती पुस्तकात ‘प्रजा’ ने विविध निकषांची गोळाबेरीज केली असता महापालिकेतील एकूण नगरसेवकांपैकी केवळ १०% म्हणजेच फक्त २२ नगरसेवकांचा ‘अ’ आणि ‘ब’ श्रेणीत समावेश आहे. तर उर्वरीत नगरसेवक क, ड, ई आणि फ श्रेणीत समाविष्ठ झाले आहेत. या संपूर्ण प्रगती पुस्तकात एकंदरीत प्रथम श्रेणी मिळवलेल्या नगरसेवक रवि राजा यांची काही वैशिष्ठे जाणून घेऊ :

“लोकप्रतिनिधी”

कोविड काळात मुंबई महापालिकेने विकेंद्रित पद्धतीने काम करण्यासाठी वॉर्ड स्तरीय ‘कोविड वॉर रुम’ सुरु केले, ज्यामध्ये काही नगरसेवकांनी महत्त्वाची भूमिका निभावली. जसे, स्थानिक पातळीवर प्रभावीपणे काम करणे, नागरिकांपर्यंत पोहोचणे, कार्यक्षमतेने त्यांच्या प्रश्नांचे निराकरण करणे इत्यादी ‘रवि राजा’ यांनी एक लोक प्रतिनिधी म्हणून यशस्वीपणे पार पाडले.

“विरोधी पक्ष नेता”

कोविड मुळे सुरू झालेल्या टाळेबंदीच्या काळात जे मदतकार्य झाले त्यात सर्वच नगरसेवक सक्रिय झाले होते. तातडीची मदत लोकांपर्यंत पोहोचावी याकरिता महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तसेच त्यांच्या नगरसेवकांनी समन्वयाने काम केले. मात्र असेच समन्वयातून केलेले काम दीर्घ काळ करत राहणे जरुरीचे होते आणि रवी राजा हे त्याचे अचूक उदाहरण बनले. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी कशाप्रकारे नियमित बैठका कराव्या तसेच एक विरोधी पक्ष नेता म्हणून शासनाला उत्तरदायित्व सिद्ध करण्यास कसे भाग पाडावे तरच हे शक्य होऊ शकेल हे सुद्धा त्यांनी त्यांच्या कृतीतून सिद्ध केले.

“कौशल्यपूर्ण नगरसेवक”

लॉकडाऊन सुरु असताना काही काळ नियमित बैठका व चर्चा पूर्णपणे थांबल्या होत्या, काही दिवसांनंतर तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ऑनलाईन स्वरुपात पुन्हा सुरु झाल्या. महामारी असो वा नसो, कोणत्याही परिस्थितीत तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करुन कामकाजाची गुणवत्ता आणि बैठकांची संख्या दोन्हीही वाढवणे गरजेचे होते. हे लक्षात घेऊन काळाच्या गरजेनुसार कार्यपद्धतीत बदल घडवून आणण्याचे कौशल्य सुद्धा ‘रवि राजा’ यांनी दाखवले.

एप्रिल २०१७ ते मार्च २०२० या काळात महिन्याला सरासरी २४ वॉर्ड बैठका घेण्यात आल्या. तर ऑक्टोबर-डिसेंबर २०२० या दरम्यान जेव्हा वॉड स्तरीय बैठका ऑनलाईन स्वरुपात झाल्या तेव्हा ही संख्या महिन्याला सरासरी २८ अशी होती. तसेच एप्रिल २०१७ ते मार्च २०२२ या काळात वॉर्ड समित्यांच्या २१ बैठका, वैधानिक समितीच्या ३२ बैठका, सर्वसाधारण सभेच्या ७ बैठका दरमहा झाल्या. तंत्रज्ञानाचा वापर करुनही बैठक संख्या व चर्चेची गुणवत्ता वाढत होती आणि अधिक समावेशक पद्धतीने निर्णयप्रक्रिया सुरु होती. रवि राजा यांनी या सर्व बैठकांमध्ये वक्तशीरतेने उपस्थिती तसेच एक जबाबदार नगरसेवक म्हणून प्रश्न उपस्थित करुन त्याचा पाठपुरावा देखील केला.

“गुणवत्ता यादी”

१. संपूर्ण प्रगती पुस्तका आधारे – ८१.१२% – ‘अ’ श्रेणी – पहिला क्रमांक
२. प्रश्न मांडणी – १८५ प्रश्न – अ’ श्रेणी – तिसरा क्रमांक
३. प्रश्नांची गुणवत्ता – ६७.०४% – सहावा क्रमांक
४. समस्यांशी निगडित प्रश्न – ‘अ’ श्रेणी
५. निधी चा वापर – ८५% – ‘अ’ श्रेणी
६. बैठकींमध्ये उपस्थिती – ‘ब’ श्रेणी
७. गुन्हेगारी नोंद – ०० – ‘अ’ श्रेणी

संबंधित यादीच्या आधारे बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सर्वश्रेष्ठ नगरसेवक झाल्याबद्दल ‘रवि कोंडू राजा’ यांचे हार्दिक अभिनंदन.

Uncensored Marathi

संदीप जाधव यांच्या राधे राधे फाउंडेशनतर्फे गोरेगावमध्ये मार्गशीर्ष महिन्याच्या निमित्ताने सामाजिक उपक्रम

Published

on

Untitled design

गोरेगाव, मुंबई: मार्गशीर्ष महिन्याच्या शुभ मुहूर्तावर, संदीप जाधव यांच्या राधे राधे फाउंडेशनने गोरेगावमध्ये एक सामाजिक कार्यक्रम आयोजित केला. या उपक्रमाचा एक भाग म्हणून, राधे राधे फाउंडेशनने महिलांना केवळ १ रुपयाच्या नाममात्र योगदानाच्या बदल्यात वेणी आणि पाच फळांचा पारंपरिक संच वितरित केला. या कार्यक्रमात महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला, आणि शेकडो महिलांनी या उपक्रमाचा लाभ घेतला.

हा कार्यक्रम राधे राधे फाउंडेशनचे संस्थापक संदीप जाधव यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला होता, जे तळागाळातील सामाजिक कार्यात सक्रियपणे सहभागी आहेत. या प्रसंगी बोलताना जाधव म्हणाले की, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरा समाजातील प्रत्येक घटकापर्यंत, विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बळ पार्श्वभूमीच्या महिलांपर्यंत पोहोचाव्यात, हे सुनिश्चित करणे हा यामागील उद्देश आहे.

स्थानिक रहिवाशांनी या उपक्रमाचे कौतुक केले आणि सांगितले की, अशा प्रयत्नांमुळे केवळ परंपरा जपल्या जात नाहीत, तर सर्वसमावेशकता आणि सामाजिक सलोखा देखील वाढतो. फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी संपूर्ण कार्यक्रमादरम्यान सुरळीत वितरण आणि सुव्यवस्थित आयोजन सुनिश्चित केले.

राधे राधे फाउंडेशनचे संस्थापक संदीप जाधव यांनी गोरेगावातील पाणी, रस्ते, प्रकाशयोजना, कोविड मदत, जनता दरबार आणि सणासुदीतील सहाय्य या सर्व उपक्रमांमुळे “विकास आणि सेवा” यांचा आदर्श ठेवणारा समाजसेवक म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. नागरिकांच्या दैनंदिन गरजांना प्राधान्य देत काम करणाऱ्या या समाजसेवकांमुळे गोरेगावातील परिसर अधिक सुरक्षित, सुसज्ज आणि सुजाण बनत आहे.

Continue Reading

Uncensored Marathi

Instagram Love Jihad Story: प्रेमासाठी पंजाबच्या हिंदू तरूणीची मुस्लिम मुलाने हिंदू नाव सांगून केली फसवणूक; लग्नासाठी रत्नागिरीत येताच मुलगा नॉट रिचेबल

Published

on

12345 9

रत्नागिरी, महाराष्ट्र – 10 ऑगस्ट, 2024: लव्ह जिहादच्या प्रकरणात फसलेल्या एका तरुणीने रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे, ज्यात तिने इंस्टाग्रामवर भेटलेल्या एका मुस्लिम मुलाने हिंदू नाव सांगून आपली फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. या घटनेमुळे इंस्टाग्राम लव्ह जिहादच्या वाढत्या संख्येबद्दल चिंता वाढली आहे.

दाखल झालेल्या FIR नुसार पीडित मुलीने म्हटले कि “जुलै 2023 मध्ये माझ्या इन्स्टाग्राम ID वर @pvt.0122_ या USER ID वरुन फ्रेंड रिक्वेस्ट आलेली होती. ती फ्रेंड रिक्वेस्ट मी स्विकारली होती. त्यानंतर समोरुन हर्षकुमार यादव नावाचा मुलगा माझ्यासोबत दररोज चॅटिंग करत होता. त्याने मला तो कॉलेजमध्ये शिक्षण घेत असल्याचे सांगून तो बीएमएसच्या दुस-या वर्षाला शिकत असल्याचे सांगितले. तो कॉलेजचा विद्यार्थी असल्याने मी त्याच्यासोबत चॅटिंग करीत होते. काही महिन्यांनंतर त्याने मला माझे फोटो पाठविण्यासाठी सांगितले. म्हणून मी त्याला माझे काही फोटो पाठवले. त्यानेदेखील त्याचे काही फोटो मला पाठविलेले होते. त्यामुळे आमच्यामध्ये बोलणे वाढत गेले. आम्ही एकमेकांना आपले व्हाट्सअँप नंबर पाठवले, तो मला व्हाट्सअँप कॉल करीत असे. हर्षकुमार यादव याने मला तो रत्नगिरी राज्य महाराष्ट्र येथे रहात असल्याचे सांगितले.

तसेच त्याचे आई वडील राजकारणामध्ये असून त्याच्या वडिलांची डिझेल फॅक्टरी आहे असे सांगितले. हर्ष सकाळी कॉलेजला जातो व कॉलेजवरुन आल्यावर वडिलांची डिझेल फॅक्टरी सांभाळतो असे त्याने मला सांगितल्याने मी त्याच्यावर प्रभावित झालेले होते.”

हर्ष नेहमी पीडित मुलीला त्याच्या आई वडिलांविषयी सांगायचा. त्याचे आईवडील त्याला नेहमी वाईट बोलतात, ओरडतात, रागवतात त्याच्यावर कोणी प्रेम करीत नाही असे सांगून तो तिच्याशी चॅटिंग करत आहे, आणि तेव्हापासून तो सुधारलेला असून त्याचे त्याच्या घरातील लोकांसोबत नातेसंबंध सुधारलेले आहेत असे बोलू लागला.

हर्षने पीडितेशी लग्न करण्याची इच्छाही व्यक्त केली. 2 ऑगस्ट 2024 रोजी हर्षने पीडितेला सांगितले की तो नुकताच 22 वर्षांचा झाला आहे आणि त्याचे आईवडील त्यांचे लग्न लावण्यास तयार आहेत. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून पीडितेने 5 ऑगस्ट 2024 रोजी रत्नागिरीला जाण्यासाठी तिचे घर सोडले, जिथे लग्न होणार होते. हर्षने कथितरित्या तिला पेटीएम द्वारे प्रवास खर्च पाठवला होता, ज्यात रिक्षाचे भाडे, चंदीगड ते रत्नागिरी ट्रेनचे तिकीट आणि बरेच काही होते.

8 ऑगस्ट 2024 रोजी रत्नागिरीला पोहोचल्यानंतर पीडितेने हर्षने दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. एका मुलीने कॉल उचलला आणि सांगितले हा हर्षचा नंबर नाही, हा रुझान चा नंबर आहे. पीडितेने हर्षबाबत चौकशी केली असता, हर्ष नावाच्या कोणत्याही व्यक्तीला ती ओळखत नाही, असे फोन वर पीडित मुलीला सांगण्यात आले.

आपली लव्ह जिहादच्या प्रकरणात फसवणूक झाल्याचा संशय आल्याने पीडितेने रत्नागिरी रेल्वे स्टेशन रोडवरील एका स्थानिक मोबाईल शॉपमध्ये मदत मागितली. तिची कहाणी ऐकून दुकान मालकाने तिच्या वडिलांशी आणि पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर पीडितेला तिच्या सुरक्षिततेसाठी सखी वन स्टॉप सेंटरमध्ये नेण्यात आले. 10 ऑगस्ट 2024 रोजी तिचे वडील, कौटुंबिक मित्र चंद्रकांत राऊळ आणि सागर कदम यांच्यासह हर्ष कुमार यादव विरुद्ध औपचारिक तक्रार दाखल करण्यासाठी तिला रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात घेऊन गेले.

दाव्यांची पडताळणी करण्यासाठी आणि गुंतलेल्या व्यक्तींची ओळख पटवण्यासाठी पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. हे प्रकरण ऑनलाइन परस्परसंवादाचे धोके आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नातेसंबंध निर्माण करताना सावधगिरी बाळगण्याची गरज अधोरेखित करते.

Continue Reading

Uncensored Marathi

मीरा रोड येथे ४ वर्षांच्या हिंदू अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी ४५ वर्षीय ‘मोहम्मद दाराज’ ला अटक

Published

on

12345

सिद्धांत मोहिते, नवघर, मीरा भायंदर:

या घटनेने परिसरात प्रचंड संताप व्यक्त होत आहे. इंटरनेटवर अनेक व्हिज्युअल समोर आले आहेत ज्यात आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करणाऱ्या नागरिकांचा जमाव नवघर पोलिस ठाण्याबाहेर मोठ्या प्रमाणात दिसत आहे.

मीरा रोड येथे एका मोहम्मद दाराज नावाच्या ४५ वर्षीय व्यक्तीला एका ४ वर्षांच्या हिंदू मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मीरा रोडच्या रामदेव पार्क परिसरात हा घृणास्पद गुन्हा घडला. आरोपी मोहम्मद दराज याला जमावाने पकडून भाईंदर पूर्व येथील नवघर पोलिस स्टेशनच्या ताब्यात दिले.

दररोज एका नवीन प्रकारच्या जिहादला सामोरे जाणाऱ्या मीरा भायंदर मधील हिंदू नागरिकांनी या भयानक घटनेनंतर प्रचंड निषेध व्यक्त केला आहे.

इंटरनेटवर अनेक व्हिज्युअल समोर आले आहेत ज्यात आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करणाऱ्या नवघर पोलिस ठाण्याबाहेर मोठ्या प्रमाणात निदर्शकांचा जमाव दिसत आहे. “त्याला 24 तासांत फाशी द्या,” असे संतप्त हिंदू नागरिकांनी पोलिस ठाण्याबाहेर सांगितले. काही व्हिज्युअल्समध्ये मांसाच्या दुकानाची तोडफोड व जाळपोळ करण्यात आली असून, दुकानाच्या परिसरात जमाव उभा आहे.

मीरा रोडवरील ऑरेंज हॉस्पिटलजवळ मोहम्मद दाराज हा ‘महाराष्ट्र चिकन शॉप’ नावाचे मांसाचे दुकान चालवतो. घटनेची माहिती मिळताच लोकांच्या जमावाने आरोपीच्या दुकानात जाऊन तोडफोड करून आरोपींना ताब्यात घेतले. त्यानंतर जमावाने नवघर पोलीस ठाणे गाठून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.

रिपोर्ट्सनुसार, सुरुवातीला पोलिसांनी या प्रकरणात एफआयआर दाखल केला नाही. मात्र, स्थानिकांच्या प्रचंड विरोधानंतर पोलिसांनी अखेर मोहम्मद दराजविरुद्ध एफआयआर दाखल केला. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

अनेक हिंदू संघटना या भयानक घटनेनंतर आक्रमक होताना दिसून येत आहे. या वेळी एका हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्याने असे म्हटले कि “मीरा-भायंदर मधले हिंदू नागरिक या आधी भीतीच्या वातावरणात राहत होते. परंतु राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी आमच्यावर ज्या जिहाद्यांनी हल्ला केला, त्यांना आम्ही प्रतिउत्तर दिलंच, आणि आता या पूढे हिंदू समाज या जिहाद्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. गेले ते दिवस जेव्हा आम्ही शांत बसून सहन करत होतो, आता आम्ही शांत बसणार नाही. आम्हाला सरकार व प्रशासनाने ने न्याय दिला नाही, तर आम्ही आमचा न्याय स्वतः मिळवू, हे सगळ्यांनी लक्षात ठेवावं”

Continue Reading

Trending