Connect with us

Uncensored Marathi

मुंबईतील सर्वोत्कृष्ट मराठी महिला उद्योजिका

Published

on

Gold Black Modern International Womens Day Greeting Instagram Story

विनया सावंत, २२ मार्च २०२३:

आजच्या युगात महिला सर्व क्षेत्रात आघाडीवर कार्यरत आहेत. यात महिला उद्योजिकांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सन्मान करूया स्त्री शक्तीचा. घर सांभाळण्यापासून ते एखादा बडा उद्योग जिद्दीने पेलणा-या महिलांविषयी पुरूषांनाही फार कौतुक आहे. आजच्या लेखात जाणून घेऊया मुंबईतील दोन सर्वोत्कृष्ट महिला उद्योजिकांविषयी. एक सामान्य स्त्री ते एक महिला उद्योजिका होईपर्यंतचा तीचा प्रवास तुमच्यातील स्त्री उद्योजिकेला नक्कीच स्फूर्ती देऊन जाईल.

  • सोनल लोहारीकर
2

सोनल लोहारीकर यांची एस डी एफ ही प्रोडक्शन कंपनी असून ‘SDF CURCUMA’ हा त्यांचा स्वत:चा ब्रॅंड आहे. ही कंपनी जर्मनी, नेदरलॅण्ड्स, ऑस्ट्रेलिया, मध्य पूर्वेकडील देशांमध्ये हळदीसोबत इतर भारतीय वस्तूंची देखील निर्यात करते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोनल लोहारीकर या भारताच्या पहिल्या उद्योजिका आहेत, ज्यांनी नागपूरची संत्री, जांभूळ, मोरींगा पावडर, देवगड हापूस, हळद आदी वस्तू परदेशात निर्यात केल्या. नुकतच सोनल यांनी लिहीलेल्या ‘माजघर’ या पुस्तकाला ‘आंतरराष्ट्रीय गोल्डन बूक पुरस्कार’ मिळाला. शिवाय त्यांना ‘आयकॉनीक वुमन ऑफ द इयर २०२२’ पुरस्काराने सन्मानित केले आहे.

यशस्वी वाटचालीबद्दल विचारले असता त्या सांगतात, “मी १६ वर्ष दुबईला होते तेव्हा तिथे आम्हाला काही भारतीय खाद्यपदार्थांची उणीव भासायची. जसं की संत्र, जांभूळ त्यामुळे मग मी भारतीय वस्तू परदेशात निर्यात करण्याचे ठरवले. मग मी भारतात येऊन शेतक-यांसोबत जोडले गेले. महाराष्ट्रातील काही भागात सर्वे केले. आणि या व्यवसायाला सुरूवात झाली. नागपूरची संत्री निर्यात करणारी आमची पहिली कंपनी आहे. आम्ही जवळपास अडीच हजार शेतक-यांसोबत काम करतो. शेतक-यांकडूनच फळं किंवा वस्तू घेतो आणि तश्याच त्या गोष्टी निर्यात करतो. सध्या ‘SDF CURCUMA’ हा हळदीचा ब्रॅंड मार्केटमध्ये टॉपला आहे.”

पुढे त्या सांगतात, “या क्षेत्रात महिला उद्योजिका फार कमी आहेत. सुरूवातीला या एक्सपोर्ट क्षेत्रात पुरूषच जास्त होते. त्यामुळे माझ्या स्ट्रगलींगच्या काळात मला अनेक चढउतारांना सामोरं जावं लागलं. मी व्यवसायातील सर्वच गोष्टींचा बारीक विचार करते. तसेच आम्ही बचत गटांना पॅकेजींगचं प्रशिक्षण देतो. पहिल्यांदा आपल्या मित्रपरिवारात या वस्तू वाटल्या व नंतर दुबईमधील विविध सुपरमार्केटमध्ये विक्रीसाठी देऊ लागलो. दुबईमधील सुप्रसिद्ध उद्योजक ‘मसालाकिंग’ डॉ. धनंजय दातार यांच्या ’अल अदिल’ सुपरमार्केटमध्ये आमची विविध उत्पादने विक्रीसाठी ठेवण्यात आली. हे आमचे सर्वात मोठे यश होते. खाद्यपदार्ध बनविण्याचा वारसा मला माझ्या आईकडून लाभला. व्यवसाय करताना आपलं आणि आपल्या भारत देशाचं नावं मोठं व्हावं ही भावना जर मनात ठेवून जर आजच्या महिलांनी सातत्य आणि मेहनत करून व्यवसाय केला. तर त्या नक्कीच यशस्वी होतील.”

  • शितल तेजस साळुंके
1

शितल साळुंके या प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आहेत. मुंबईतील मालाड परिसरात त्यांचा टीनाझ मेकअप स्टुडिओ आणि स्वत:ची एमएसएमई मान्यताप्राप्त अकॅडमी देखील आहे. या माध्यमातून त्या व्यवसायाबरोबरच व्यावसायिक प्रशिक्षण देण्याचे देखील काम करतात. या क्षेत्रात त्या मागील ६ वर्षांपासून काम करत आहेत. यादरम्यान त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. त्यात त्यांना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते ‘बेस्ट स्टार्टअप अकॅडमी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच CAIT तर्फे नुकताच ‘आयकॉनिक वूमन अवॉर्ड २०२३’ सुद्धा त्यांना मिळाला आहे.

मालाड येथील क्लासेस मध्ये त्या बेसिक ते ऍडव्हान्स असे विविध प्रमाणपत्र व डिप्लोमा कोर्सेस चालवतात. ज्यात सेल्फ मेकअप, ब्राईडल मेकअप, हेअर स्टाईल, नवरी ला साडी कशी नेसायची हे सर्व शिकवतात. प्रशिक्षण कालावधी पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्या एमएसएमई मान्यताप्राप्त प्रमाणपत्र देखील देतात.

यशस्वी वाटचालीबद्दल विचारले असता त्या म्हणाल्या, “मी एकदा एका मैत्रिणीच्या घरामध्ये कार्यक्रमानिमित्त माझ्याकडे असलेल्या मेकअप किट च्या माध्यमातून तिचा मेकअप केला. त्यावर लोकांनी प्रचंड प्रमाणावर प्रेम दाखवत मला स्वतःहून ऑर्डर द्यायला सुरुवात केली. त्यावेळी मी कुठलेही प्रशिक्षण घेतले नव्हते. मला असणारी आवड आणि लोकांच्या प्रतिक्रिया पाहता पूर्णवेळ या क्षेत्रात येण्याचा मी निर्णय घेतला. बेसिक पासून मास्टर पर्यंत मेकअपचे प्रशिक्षण घेतले. ब्राईडल मेकअप मध्ये माझे स्पेशलायझेशन आहे. अजूनही मी सतत सराव करत असते व बदलत्या काळाप्रमाणे स्वतःला अपडेट ठेवते.”

पुढे बोलताना त्या म्हणाल्या, “व्यवसाय करताना त्याची जाहिरात ही फार महत्वाची असते. सोशल मीडिया 30 टक्के प्रभावी असते मात्र 70 टक्के स्वतः मेहनत घ्यावी लागते. मी पत्रक छापून वाटली, छोट्या मोठ्या मार्केट मध्ये काम केलं, लोकांना लाईव्ह सेशन करून दाखवले तसेच काही महिला उद्योजिकांचे ग्रुप आहेत त्याद्वारे मी माझ्या ग्राहकांपर्यंत पोहोचले. स्वतःची क्षमता ओळखली तर महिला कुठल्याही क्षेत्रात चमकदार कामगिरी करू शकतात असे मला वाटते.”

Uncensored Marathi

माहिती अधिकार कार्यकर्ता संकेत नलावडे यांच्या पाठपुराव्याला यश; आमदार सुनील प्रभू यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या मुद्द्यानंतर शासनाची कारवाई

Published

on

ChatGPT Image Jul 12 2026 12 56 07 PM

माहिती अधिकार कार्यकर्ता संकेत नलावडे यांनी उपलब्ध करून दिलेल्या माहिती व कागदपत्रांच्या आधारे आमदार सुनील प्रभू यांनी विधानसभेतील अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये माजी मुद्रांक जिल्हाधिकारी तथा म्हाडाच्या सहमुख्य अधिकारी वंदना सूर्यवंशी यांच्या प्रकरणाकडे शासनाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानुसार महसूल व वन विभागाने वंदना सूर्यवंशी यांची प्रतिनियुक्ती समाप्त करून त्यांना महसूल विभागात दि. १३ जुलै २०२६ रोजी तात्काळ रुजू होण्याचे आदेश जारी केले आहेत.

विधानसभेत उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्यांमध्ये कथित महसूल नुकसान, सुरू असलेली विभागीय चौकशी तसेच शासनाच्या आदेशांच्या अंमलबजावणीचा विषय समाविष्ट होता. शासनाच्या आदेशानुसार संबंधित अधिकाऱ्यांना निश्चित मुदतीत महसूल विभागात रुजू होण्याचे निर्देश देण्यात आले असून, आदेशाचे पालन न झाल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

या निर्णयामुळे आमदार सुनील प्रभू यांनी विधानसभेत केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत असून, माहिती अधिकार कार्यकर्ता संकेत नलावडे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची राजकीय व प्रशासकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. शासनाच्या या निर्णयामुळे प्रशासकीय पारदर्शकता व उत्तरदायित्व अधिक बळकट होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Continue Reading

Uncensored Marathi

संदीप जाधव यांच्या राधे राधे फाउंडेशनतर्फे गोरेगावमध्ये मार्गशीर्ष महिन्याच्या निमित्ताने सामाजिक उपक्रम

Published

on

Untitled design

गोरेगाव, मुंबई: मार्गशीर्ष महिन्याच्या शुभ मुहूर्तावर, संदीप जाधव यांच्या राधे राधे फाउंडेशनने गोरेगावमध्ये एक सामाजिक कार्यक्रम आयोजित केला. या उपक्रमाचा एक भाग म्हणून, राधे राधे फाउंडेशनने महिलांना केवळ १ रुपयाच्या नाममात्र योगदानाच्या बदल्यात वेणी आणि पाच फळांचा पारंपरिक संच वितरित केला. या कार्यक्रमात महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला, आणि शेकडो महिलांनी या उपक्रमाचा लाभ घेतला.

हा कार्यक्रम राधे राधे फाउंडेशनचे संस्थापक संदीप जाधव यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला होता, जे तळागाळातील सामाजिक कार्यात सक्रियपणे सहभागी आहेत. या प्रसंगी बोलताना जाधव म्हणाले की, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरा समाजातील प्रत्येक घटकापर्यंत, विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बळ पार्श्वभूमीच्या महिलांपर्यंत पोहोचाव्यात, हे सुनिश्चित करणे हा यामागील उद्देश आहे.

स्थानिक रहिवाशांनी या उपक्रमाचे कौतुक केले आणि सांगितले की, अशा प्रयत्नांमुळे केवळ परंपरा जपल्या जात नाहीत, तर सर्वसमावेशकता आणि सामाजिक सलोखा देखील वाढतो. फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी संपूर्ण कार्यक्रमादरम्यान सुरळीत वितरण आणि सुव्यवस्थित आयोजन सुनिश्चित केले.

राधे राधे फाउंडेशनचे संस्थापक संदीप जाधव यांनी गोरेगावातील पाणी, रस्ते, प्रकाशयोजना, कोविड मदत, जनता दरबार आणि सणासुदीतील सहाय्य या सर्व उपक्रमांमुळे “विकास आणि सेवा” यांचा आदर्श ठेवणारा समाजसेवक म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. नागरिकांच्या दैनंदिन गरजांना प्राधान्य देत काम करणाऱ्या या समाजसेवकांमुळे गोरेगावातील परिसर अधिक सुरक्षित, सुसज्ज आणि सुजाण बनत आहे.

Continue Reading

Uncensored Marathi

Instagram Love Jihad Story: प्रेमासाठी पंजाबच्या हिंदू तरूणीची मुस्लिम मुलाने हिंदू नाव सांगून केली फसवणूक; लग्नासाठी रत्नागिरीत येताच मुलगा नॉट रिचेबल

Published

on

12345 9

रत्नागिरी, महाराष्ट्र – 10 ऑगस्ट, 2024: लव्ह जिहादच्या प्रकरणात फसलेल्या एका तरुणीने रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे, ज्यात तिने इंस्टाग्रामवर भेटलेल्या एका मुस्लिम मुलाने हिंदू नाव सांगून आपली फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. या घटनेमुळे इंस्टाग्राम लव्ह जिहादच्या वाढत्या संख्येबद्दल चिंता वाढली आहे.

दाखल झालेल्या FIR नुसार पीडित मुलीने म्हटले कि “जुलै 2023 मध्ये माझ्या इन्स्टाग्राम ID वर @pvt.0122_ या USER ID वरुन फ्रेंड रिक्वेस्ट आलेली होती. ती फ्रेंड रिक्वेस्ट मी स्विकारली होती. त्यानंतर समोरुन हर्षकुमार यादव नावाचा मुलगा माझ्यासोबत दररोज चॅटिंग करत होता. त्याने मला तो कॉलेजमध्ये शिक्षण घेत असल्याचे सांगून तो बीएमएसच्या दुस-या वर्षाला शिकत असल्याचे सांगितले. तो कॉलेजचा विद्यार्थी असल्याने मी त्याच्यासोबत चॅटिंग करीत होते. काही महिन्यांनंतर त्याने मला माझे फोटो पाठविण्यासाठी सांगितले. म्हणून मी त्याला माझे काही फोटो पाठवले. त्यानेदेखील त्याचे काही फोटो मला पाठविलेले होते. त्यामुळे आमच्यामध्ये बोलणे वाढत गेले. आम्ही एकमेकांना आपले व्हाट्सअँप नंबर पाठवले, तो मला व्हाट्सअँप कॉल करीत असे. हर्षकुमार यादव याने मला तो रत्नगिरी राज्य महाराष्ट्र येथे रहात असल्याचे सांगितले.

तसेच त्याचे आई वडील राजकारणामध्ये असून त्याच्या वडिलांची डिझेल फॅक्टरी आहे असे सांगितले. हर्ष सकाळी कॉलेजला जातो व कॉलेजवरुन आल्यावर वडिलांची डिझेल फॅक्टरी सांभाळतो असे त्याने मला सांगितल्याने मी त्याच्यावर प्रभावित झालेले होते.”

हर्ष नेहमी पीडित मुलीला त्याच्या आई वडिलांविषयी सांगायचा. त्याचे आईवडील त्याला नेहमी वाईट बोलतात, ओरडतात, रागवतात त्याच्यावर कोणी प्रेम करीत नाही असे सांगून तो तिच्याशी चॅटिंग करत आहे, आणि तेव्हापासून तो सुधारलेला असून त्याचे त्याच्या घरातील लोकांसोबत नातेसंबंध सुधारलेले आहेत असे बोलू लागला.

हर्षने पीडितेशी लग्न करण्याची इच्छाही व्यक्त केली. 2 ऑगस्ट 2024 रोजी हर्षने पीडितेला सांगितले की तो नुकताच 22 वर्षांचा झाला आहे आणि त्याचे आईवडील त्यांचे लग्न लावण्यास तयार आहेत. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून पीडितेने 5 ऑगस्ट 2024 रोजी रत्नागिरीला जाण्यासाठी तिचे घर सोडले, जिथे लग्न होणार होते. हर्षने कथितरित्या तिला पेटीएम द्वारे प्रवास खर्च पाठवला होता, ज्यात रिक्षाचे भाडे, चंदीगड ते रत्नागिरी ट्रेनचे तिकीट आणि बरेच काही होते.

8 ऑगस्ट 2024 रोजी रत्नागिरीला पोहोचल्यानंतर पीडितेने हर्षने दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. एका मुलीने कॉल उचलला आणि सांगितले हा हर्षचा नंबर नाही, हा रुझान चा नंबर आहे. पीडितेने हर्षबाबत चौकशी केली असता, हर्ष नावाच्या कोणत्याही व्यक्तीला ती ओळखत नाही, असे फोन वर पीडित मुलीला सांगण्यात आले.

आपली लव्ह जिहादच्या प्रकरणात फसवणूक झाल्याचा संशय आल्याने पीडितेने रत्नागिरी रेल्वे स्टेशन रोडवरील एका स्थानिक मोबाईल शॉपमध्ये मदत मागितली. तिची कहाणी ऐकून दुकान मालकाने तिच्या वडिलांशी आणि पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर पीडितेला तिच्या सुरक्षिततेसाठी सखी वन स्टॉप सेंटरमध्ये नेण्यात आले. 10 ऑगस्ट 2024 रोजी तिचे वडील, कौटुंबिक मित्र चंद्रकांत राऊळ आणि सागर कदम यांच्यासह हर्ष कुमार यादव विरुद्ध औपचारिक तक्रार दाखल करण्यासाठी तिला रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात घेऊन गेले.

दाव्यांची पडताळणी करण्यासाठी आणि गुंतलेल्या व्यक्तींची ओळख पटवण्यासाठी पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. हे प्रकरण ऑनलाइन परस्परसंवादाचे धोके आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नातेसंबंध निर्माण करताना सावधगिरी बाळगण्याची गरज अधोरेखित करते.

Continue Reading

Trending