Politics

प्रभाग क्रमांक ५१ मध्ये अपक्ष उमेदवार सुशिला संदीप जाधव ठरत आहेत जनतेच्या विश्वासाचं नेतृत्व

Published

on

मुंबई: प्रभाग क्रमांक ५१ मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असलेल्या सौ. सुशिला संदीप जाधव या स्थानिक नागरिकांच्या प्रश्नांशी थेट जोडलेलं आणि विश्वासार्ह नेतृत्व म्हणून पुढे येत आहेत. ‘बासुरी’ या निवडणूक चिन्हावर त्या निवडणूक लढवत असून, त्यांचे काम पारदर्शक, लोकाभिमुख आणि सेवाभावाने प्रेरित असल्याचे त्या सांगतात.

प्रभाग क्रमांक ५१ मध्येच लहानाच्या मोठ्या झालेल्या सुशिला जाधव यांनी येथील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, SRA प्रकल्प, तसेच महिलांच्या सुरक्षेसारख्या समस्या जवळून अनुभवल्या.

वर्षानुवर्षे आश्वासनांवर चालणाऱ्या आणि कामात ढिलाई राहिलेल्या परिस्थितीत बदल घडवण्यासाठीच त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उतरायचा निर्णय घेतला.

राधे-राधे फाउंडेशनद्वारे केलेले उल्लेखनीय कार्य
सुशिला
संदीप जाधव आणि त्यांच्या टीमने गेल्या काही वर्षांत सत्तेपासून दूर राहूनही केवळ सेवाभावाने अनेक उपक्रम राबवले आहेत—

  • पाणी समस्या सोडवण्यासाठी २० हून अधिक ठिकाणी स्वखर्चाने नवीन पाईपलाईनची व्यवस्था
  • SRA प्रकल्पांमध्ये नागरिकांना मार्गदर्शन करून पात्र–अपात्र सभासदांना हक्काचे भाडे मिळवून देणे
  • अनेक मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन
  • रेशन कार्ड, आधार कार्ड आणि विविध शासकीय योजना प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणे
  • महानगरपालिका व पोलीस ठाण्यासंबंधित समस्यांत तत्पर मदत
  • गरजूंना अन्न, वस्त्र आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
  • तब्बल ४,८०० मजुरांना e-Shram कार्ड उपलब्ध करून देणे
  • ज्येष्ठ नागरिक व विधवा महिलांना पेन्शन आणि आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन
    जनतेशी संवाद साधताना सुशिला जाधव म्हणाल्या,
    “जशी बासुरी योग्य संतुलनातून सुरेल संगीत निर्माण करते, तसंच प्रशासन आणि जनता यांच्या समन्वयातूनच खरा विकास घडू शकतो.”

    त्या अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असल्यामुळे कोणत्याही पक्षीय दबावाशिवाय फक्त जनतेच्या हितासाठी काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

    स्वच्छता, मूलभूत सुविधा, महिला व ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षा, पारदर्शक प्रशासन आणि नागरिकांना योग्य न्याय मिळवून देणे — हे त्यांच्या कामकाजाचे मुख्य मुद्दे राहणार आहेत.

    विशेष म्हणजे, त्यांच्या शांत, संयमी आणि कामकेंद्रित स्वभावामुळे महिलांमध्ये आणि कुटुंबांमध्ये त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.


    निवडणूक जवळ येत असताना ‘बासुरी’ हे चिन्ह शांत पण ठाम नेतृत्वाचे प्रतीक म्हणून प्रभागात ओळख निर्माण करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version